सलग तिसरा रविवार भटकंतीचा. क्या करे कंट्रोल नही होता.... काही केलेतरी घरी बसवत नाही मग काय ह्या रविवारी भटकंतीचे ठिकाण च घेतले किल्ले भास्करगड उर्फ बसगड . किल्ले बसगड म्हणजे हरिहरच्या बाजूचा ट्रेक.
जिथे सगळी दुनिया वेड्यासारखी जाते तिथे आम्ही कधीच जात नाही म्हणूनच बसगडला जायचा निर्णय घेतला आणि घेतलेला हा निर्णय अगदी योग्य होता.
सकाळी ८ च्या सुमारास कसारा स्टेशन गाठलं. तिथून ठरल्याप्रमाणे जीप घेऊन निरगुडपड्याला जायला सुरवात केली. मधेच फक्त पेट्रोल भरायला आणि नाश्त्यासाठी "बाबा दा ढाबा" वर थांबलो. तिथे चहा पिऊन पुढच्या वाटेला लागलो सुमारे एक तासच पुढे गेलो असुत आणि तिथूनच धुकं सुरू झालं तेव्हाच समजलो आजचा ट्रेक अफलातून असणार आहे. सव्वा दहाच्या सुमारास आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलो. आणि चढाईला सुरवात केली.
आधी दगडी असणारा रस्ता तुम्हाला शेवट पर्यंत कळू देत नाही की वर चढायला रस्ता कुठून आहे ते पण लक्ष दिलं तर कळून येत तिथे एक ठिकाणी लिहून ठेवलं आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूने वर जाणारा रास्ता थेट गडावर जातो. गडावर जाईपर्यंत ठिकठिकाणी दिशादर्शक लावलेले आहेत. काही काही ठिकाणी रस्ता चुकू नये म्हणून दगडांचे मनोरे रचलेले आहेत. जेणे करून कोणी वाट चुकू नये
अजून ही धुकं अजिबात कमी झालं नव्हतं. एव्हाना आजूबाजूचे दृश्य पाहून जंगलात केलेला प्रवेश हा जाणवायला लागला होता. धुक्यामुळे आपली माणसे आपल्या जवळ येईपर्यंत ती आपल्यासोबत आहेत ह्याचा विश्वास बसत नव्हता म्हणून आमची चाल थोडी धीम्या गतीने चालू होती आणि त्याचा परिणाम आमच्या परतीच्या प्रवासावर होणार ह्याचा आम्हाला अंदाज होता. पण हे निसर्ग सौंदर्य सोडून पुढे जाणे व्यर्थ होते.
ह्या क्षणाचा थोडासा आनंद घेत चालतच होतो तोच पुढे एक छोटासा खरतर पॅच लागला. ह्या वाटेवरचा हाच एक खडतर क्षण बाकी सगळीकडे पाऊल वाट आणि बाजूला मन मोहित करणारा निसर्ग. ह्या वातावरणामुळे थकव्याचा अंदाज सुद्धा आला नाही.
गडावर आजमितीस काही अवशेष शिल्लक नसले तरी एक बुरुज दोन पाण्याचे टाके आणि एक हनुमानाची मूर्ती अस्तित्वात आहे.गडाचा इतिहास पाहता इ.स १२७१ ते १३०८ पर्यंत हा किल्ला देवगिरीच्या अधिपत्याखाली होता. नंतर बहामनी पुढे निजामशाही यांच्याकडे किल्ला होता. निजामशाहीच्या अंतकाळात इ.स १६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड केले, तेव्हा भास्करगड त्यांच्या ताब्यात गेला. १६३३ मध्ये शहाजी राजांकडून हा किल्ला मोगलांकडे गेला १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने हा किल्ला जिंकून घेतला.१६८८ मध्ये मोगलांनी भास्करगड जिंकून घेतला. इ.स १७३० मध्ये कोळ्यांनी बंड करुन तो घेतला पूढे १८१८ पर्यंत हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता.
एव्हाना आम्हाला कळून चुकलं होता की ६ ची गाडी मिळणं अशक्य आहे. त्यामुळे आम्ही आरामात जायचं ठरवलं. पुन्हा एकदा "बाबा दा धाब्या"वर थांबलो. मनसोक्त चहा नाश्ता केला आणि संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास पुन्हा कसारा स्टेशनला पोचलो. सव्वाआठची लोकल पकडून साडेनऊ ला घरी.
त्यांनंतर संपूर्ण आठवड्यात मला कोणीही विचारलं की कुठे गेलेला ह्या रविवारी?? तर माझं उत्तर ठरलेलं होतं "ढगात"!!!
काही महत्वाच्या गोष्टी
सकाळी ८ च्या सुमारास कसारा स्टेशन गाठलं. तिथून ठरल्याप्रमाणे जीप घेऊन निरगुडपड्याला जायला सुरवात केली. मधेच फक्त पेट्रोल भरायला आणि नाश्त्यासाठी "बाबा दा ढाबा" वर थांबलो. तिथे चहा पिऊन पुढच्या वाटेला लागलो सुमारे एक तासच पुढे गेलो असुत आणि तिथूनच धुकं सुरू झालं तेव्हाच समजलो आजचा ट्रेक अफलातून असणार आहे. सव्वा दहाच्या सुमारास आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलो. आणि चढाईला सुरवात केली.
आधी दगडी असणारा रस्ता तुम्हाला शेवट पर्यंत कळू देत नाही की वर चढायला रस्ता कुठून आहे ते पण लक्ष दिलं तर कळून येत तिथे एक ठिकाणी लिहून ठेवलं आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूने वर जाणारा रास्ता थेट गडावर जातो. गडावर जाईपर्यंत ठिकठिकाणी दिशादर्शक लावलेले आहेत. काही काही ठिकाणी रस्ता चुकू नये म्हणून दगडांचे मनोरे रचलेले आहेत. जेणे करून कोणी वाट चुकू नये
किल्ले बसगडकडे जाणारी वाट
योग्य वाट दर्शविण्यासाठी केलेले दगडांचे मनोरे
दिशादर्शक
येणाऱ्या वाटेत बऱ्याच वाटा निघतात. पण गड डाव्या बाजूला असल्याकारणाने आपण डाव्या बाजूची वाट धरूनच वर चढायचं हे पक्क मनात होतं. त्यादिशेने वाटचाल चालू होती.
कोब्रा लिली
ऑर्किड
निसर्ग दर्शन
पण काय करणार ते म्हणतात ना निसर्गासमोर कोणाचे काही चालत नाही. सुमारे एक तास आम्ही चाललो तरीही धुक्यामुळे नक्की गड कुठे आहे हे कळत नव्हते. पण एका ठिकाणी २ रस्ते दिसतात म्हणून आम्ही एका ठिकाणी सगळे जण थांबलो आणि समोरून आलेल्या वाऱ्याच्या झुळूकने धुक्याचा पडदा थोडासा बाजूला केला आणि समोर पाहतो तो एक महाकाय डोंगर नजरेस पडला हाच तो बसगड उर्फ भास्करगड . पण जरी समोर दिसत असला तरी त्याची खरी चढाई बाकी होती खरी म्हणण्यापेक्षा "खडतर". कारण आतापर्यंत गडावर जाणारी वाट ही विस्तृत होती खूप ठिकाणी पठार होतं
किल्ले बसगड
पण आता जाणारी वाट ही निमुळती आणि अरुंद होती म्हणून आता आम्ही एका रांगेत जायला सुरुवात केली. डाव्याबाजूला महाकाय पर्वत वरून पडणारे धबधब्याचे तुषार आणि उजव्या बाजूला धुक्याने व्यापलेली खोल दरी स्वर्गसुखाचा आनंद देत होती.ह्या क्षणाचा थोडासा आनंद घेत चालतच होतो तोच पुढे एक छोटासा खरतर पॅच लागला. ह्या वाटेवरचा हाच एक खडतर क्षण बाकी सगळीकडे पाऊल वाट आणि बाजूला मन मोहित करणारा निसर्ग. ह्या वातावरणामुळे थकव्याचा अंदाज सुद्धा आला नाही.
हीच ती खडतर वाट
ही खडतर वाटही सगळ्यांनी शिताफीने पार केली फक्त जास्त जण असल्याने थोडा वेळ लागला. सगळेजण सुखरूप पुढे आल्यावर आम्ही पुढे निघालो. साधारण ५ मिनिटाच्या अंतरावरच आम्ही गडाच्या प्रवेशद्वाराशी पोचलो जिथून
गडाच्या पायऱ्या चालू होतात.
सर्पिलाकार जिना
ह्या सर्पिलाकार पायऱ्यांमुळेच हा किल्ला प्रसिद्ध आहे. पायऱ्याजवळ खूप
सारे फोटो काढून पुन्हा पुढची वाट धरली पुढच्या पायऱ्या चालण्यास योग्य
नासल्यातरी आजही मजबूत आहेत.पावसामुळे घरंगळत आलेली दगड ह्याच पायऱ्यावर
येऊन थांबल्यामुळे आता हा रस्ता चालण्या लायक राहिला नसला तरी वाट काढून
जाऊ शकतो. ह्याच पायऱ्या संपल्यावर समोर नजरेस पडतं ते ह्या गडाचे
प्रवेशद्वार.
बसगडाचे प्रवेशद्वार
उंचीने कमी असले तरीही हे प्रवेशद्वार रेखीव आणि देखणे आहे. महाराजांचा मान
राखत ह्या प्रवेशद्वारातून वाकुनच प्रवेश करावा लागतो. त्यातून आत
गेल्यावर सुमारे सात आठ पायऱ्या चढल्यावर आपणास समोर दिसते ती सरळ चढाई ही
चढल्यावर आपण बसगडावर पोहोचतो. गडावर आजमितीस काही अवशेष शिल्लक नसले तरी एक बुरुज दोन पाण्याचे टाके आणि एक हनुमानाची मूर्ती अस्तित्वात आहे.गडाचा इतिहास पाहता इ.स १२७१ ते १३०८ पर्यंत हा किल्ला देवगिरीच्या अधिपत्याखाली होता. नंतर बहामनी पुढे निजामशाही यांच्याकडे किल्ला होता. निजामशाहीच्या अंतकाळात इ.स १६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड केले, तेव्हा भास्करगड त्यांच्या ताब्यात गेला. १६३३ मध्ये शहाजी राजांकडून हा किल्ला मोगलांकडे गेला १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने हा किल्ला जिंकून घेतला.१६८८ मध्ये मोगलांनी भास्करगड जिंकून घेतला. इ.स १७३० मध्ये कोळ्यांनी बंड करुन तो घेतला पूढे १८१८ पर्यंत हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता.
आजकल क्या चल रहा है?? FOGG
सुमारे दीड वाजायच्या सुमारास आम्ही गडावर पोचलो आणि पोटभर जेवणाचा आनंद घेतला आणि आजूबाजूचा परिसर न्याहालायला सुरुवात केली धुकं इतकं होता की जवळ गेल्याशिवाय काही दिसुच शकत नव्हता म्हणून डाव्याबाजूने वर जायला निघालो वर गेल्यावर तुफान हवा आणि धुकं होत थोडं पुढे गेल्यावर हनुमानाची एक मूर्ती दिसली तिच्या बाजूने घातलेलं प्लास्टिक च कुंपण. आज तीच निवाऱ्याची सोया वाटत होती. तिथून दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो
गडावरील हनुमान मंदिर
पुन्हा तोच थरार अनुभवत आम्ही अर्ध्या वाटेपर्यंत आलो पण पुढे नकळत एक वाट चुकीची धरली गेली आणि आम्ही भरकटलो. पण अजय कडे GPS असल्यामुळे काही वेळच्या आताच आम्ही आमच्या योग्य वाटेला लागलो पण तेव्हा आम्हाला GPS महत्व कळलं करण त्यावेळी जर ते आमच्याकडे नसत तर काय माहीत कदाचित आमचा अजून वेळ तिकडे गेला असता. कारण आमच्याकडे पर्याय पण नव्हता चारी बाजूला धुकं होत कुठे जायचे ह्याचा काही अंदाज येत नव्हता. योग्य वाटेल लागून आम्ही 5 च्या सुमारास पुन्हा पायथ्याशी लागलो.एव्हाना आम्हाला कळून चुकलं होता की ६ ची गाडी मिळणं अशक्य आहे. त्यामुळे आम्ही आरामात जायचं ठरवलं. पुन्हा एकदा "बाबा दा धाब्या"वर थांबलो. मनसोक्त चहा नाश्ता केला आणि संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास पुन्हा कसारा स्टेशनला पोचलो. सव्वाआठची लोकल पकडून साडेनऊ ला घरी.
त्यांनंतर संपूर्ण आठवड्यात मला कोणीही विचारलं की कुठे गेलेला ह्या रविवारी?? तर माझं उत्तर ठरलेलं होतं "ढगात"!!!
काही महत्वाच्या गोष्टी
- गडावर जाण्यासाठी जवळचे स्टेशन कसारा. कसाऱ्यावरून निरगुडपाड्यास जाण्यासाठी जीप मिळते. नंबर हवा असल्यास कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करावा.
- गडावर जाण्यासाठी जरी गाईड लागत नसला तरी दिशादर्शकाकडे लक्ष ठेवून वाटचाल करावी.
No comments:
Post a Comment