इतके वर्ष अंबरनाथमध्ये राहतोय पण कोणाच्याच तोंडून ताहुली म्हणून काय हे ऐकलंच नव्हतं. एकेदिवशी मित्राचा
फोन आला अरे अंबरनाथमध्ये ताहुली कुठे आहे ऐकलंय का??? ताहुली म्हणून एक
उंचावरची जागा आहे पण गड म्हणाल तर आम्हाला मलंगगडच माहिती होता. मग काय
नवीन ठिकाणाला भेट द्यायची म्हणून ताहुली शिखरावर जायचा निर्णय घेतला.
ताहुलीला जाण्यासाठी कल्याणला उतरून हजीमलंगला जाणारी बस पकडावी लागते. वाटेत कुशिवली गाव लागते बस स्टॉप वरून समोर जाणारी वाटच ताहुलीच्या दिशेने जाते. आधी गावात चौकशी करून आम्ही पुढच्या वाटेला लागलो. सुरुवातीची पूर्ण वाट लालमातीची होती पाऊस असल्याने ती पूर्ण चिखलाची होती. त्यातही वाट काढत आम्ही पुढे निघालो तोच समोर एक धबधबा लागला आणि आमची जाणारी वाटही धबधब्यातून जाणारच होती त्यामुळे सगळ्यांसाठीच एक वेगळ्याप्रकारचे Thrill होते.
धबधब्यावर थोडं भिजून पुढे निघालो. पाऊस बऱ्यापैकी होता डाव्याबाजूला आम्हाला आमचं ध्येय स्पष्टपणे दिसत होतं. वाटेवर प्रत्येक ठिकाणी योग्य दिशादर्शक असल्याने वाट चुकण्याचा काही संबंधच नव्हता. फक्त जंगलवाट असल्याने जसजसं आतमध्ये प्रवेश करत होतो तसंतसं अंधार वाढत चालला होता. पायथ्यावरून बघितल्यावर घनदाट जंगलाचा अंदाज आलाच होता आणि तोच अनुभव घ्यायला आम्ही जंगलात प्रवेश केला होता.
पावसामुळे झाडांना फुटलेली पालवी नवनवीन रंगांची फुले मनाला भुरळ घालत होती. त्यांचे फोटो काढून आम्ही पुढे जात असतानाच एका अश्याजागी येऊन थांबलो जिथून कल्याणचा परिसर स्पष्ट दिसू लागला होता. पण ही खऱ्या अर्थाने फक्त सुरुवातच होती कारण हा ट्रेक इतका साधा नव्हता. समोर दिसणारा "बामण्या" सुळका आम्हाला खुणावत होता. सुरुवातीला ताहुलीच्या उजव्या बाजूला दिसणारा हा सुळका आता आमच्या समोर उभा ठाकला होता. उजव्या बाजूला हजीमलंगचा डोंगर आणि डाव्या बाजूस ताहुली. ताहुली जरी उजव्या बाजूस असलं तरी अजूनपर्यंत ते आम्हाला दिसत पण नव्हतं. बामण्या सुळक्याच्या समोर उभे राहून काही फोटो काढून पुन्हा डाव्या हाताने आमचा प्रवास सुरु केला.
थोडंस पुढे गेल्यावर दगडांनी व्यवस्थित रचलेल्या पायऱ्या लागल्या. वाटेत एक महादेवाचं मंदिर लागलं. सध्या त्या मंदिराच्या डागडुजीचं काम चालू होतं म्हणून तिथे असणाऱ्या काही माणसांना विचारलं हा मागे दिसणारा सुळका कोणता??? तेव्हा आम्हाला कळलं तो म्हणजे "बामण्या". तेव्हाच त्यांना विचारलं अजून किती वेळ लागेल तेव्हा ते म्हणाले अजून दीड तास तरी लागेल. एव्हाना बारा वाजलेच होते. पण ट्रेक अर्धवट पण सोडायचा नव्हता मग आपल्या चालीचा वेग वाढवला.
वरती पोहोचल्यावर जवळपास सगळी वाट पठारीच होती. हवामानानेही साथ दिल्याने थकवा काही जाणवत नव्हता. किर्र काळोखाच्या ही वाट अचानक एका जागेवर दुतर्फा झाली चालता चालता वाटेत एका बाजूला मुंग्यांचे भलेमोठे वारूळ लागले. डाव्या बाजूला एक धबधबा नजरेस पडला. येताना तिकडे जायचा विचार केला कारण आत्ता आधी वर पोहोचणं गरजेचं होतं एव्हाना भूक पण प्रचंड लागली होती.
खरंतर खालून वर पाहिल्यावर आम्ही गाठलेल्या ध्येयावर आम्हालाच विश्वास बसत नव्हता.
पण जे होतं ते खरं होतं.
मला तर असं वाटलं ह्या पर्वातला हा सगळ्यात उत्तम ट्रेक होता. आणि तो झालाही तसाच एक नंबर.
ताहुलीला जाण्यासाठी कल्याणला उतरून हजीमलंगला जाणारी बस पकडावी लागते. वाटेत कुशिवली गाव लागते बस स्टॉप वरून समोर जाणारी वाटच ताहुलीच्या दिशेने जाते. आधी गावात चौकशी करून आम्ही पुढच्या वाटेला लागलो. सुरुवातीची पूर्ण वाट लालमातीची होती पाऊस असल्याने ती पूर्ण चिखलाची होती. त्यातही वाट काढत आम्ही पुढे निघालो तोच समोर एक धबधबा लागला आणि आमची जाणारी वाटही धबधब्यातून जाणारच होती त्यामुळे सगळ्यांसाठीच एक वेगळ्याप्रकारचे Thrill होते.
धबधब्यावर थोडं भिजून पुढे निघालो. पाऊस बऱ्यापैकी होता डाव्याबाजूला आम्हाला आमचं ध्येय स्पष्टपणे दिसत होतं. वाटेवर प्रत्येक ठिकाणी योग्य दिशादर्शक असल्याने वाट चुकण्याचा काही संबंधच नव्हता. फक्त जंगलवाट असल्याने जसजसं आतमध्ये प्रवेश करत होतो तसंतसं अंधार वाढत चालला होता. पायथ्यावरून बघितल्यावर घनदाट जंगलाचा अंदाज आलाच होता आणि तोच अनुभव घ्यायला आम्ही जंगलात प्रवेश केला होता.
पावसामुळे झाडांना फुटलेली पालवी नवनवीन रंगांची फुले मनाला भुरळ घालत होती. त्यांचे फोटो काढून आम्ही पुढे जात असतानाच एका अश्याजागी येऊन थांबलो जिथून कल्याणचा परिसर स्पष्ट दिसू लागला होता. पण ही खऱ्या अर्थाने फक्त सुरुवातच होती कारण हा ट्रेक इतका साधा नव्हता. समोर दिसणारा "बामण्या" सुळका आम्हाला खुणावत होता. सुरुवातीला ताहुलीच्या उजव्या बाजूला दिसणारा हा सुळका आता आमच्या समोर उभा ठाकला होता. उजव्या बाजूला हजीमलंगचा डोंगर आणि डाव्या बाजूस ताहुली. ताहुली जरी उजव्या बाजूस असलं तरी अजूनपर्यंत ते आम्हाला दिसत पण नव्हतं. बामण्या सुळक्याच्या समोर उभे राहून काही फोटो काढून पुन्हा डाव्या हाताने आमचा प्रवास सुरु केला.
थोडंस पुढे गेल्यावर दगडांनी व्यवस्थित रचलेल्या पायऱ्या लागल्या. वाटेत एक महादेवाचं मंदिर लागलं. सध्या त्या मंदिराच्या डागडुजीचं काम चालू होतं म्हणून तिथे असणाऱ्या काही माणसांना विचारलं हा मागे दिसणारा सुळका कोणता??? तेव्हा आम्हाला कळलं तो म्हणजे "बामण्या". तेव्हाच त्यांना विचारलं अजून किती वेळ लागेल तेव्हा ते म्हणाले अजून दीड तास तरी लागेल. एव्हाना बारा वाजलेच होते. पण ट्रेक अर्धवट पण सोडायचा नव्हता मग आपल्या चालीचा वेग वाढवला.
वरती पोहोचल्यावर जवळपास सगळी वाट पठारीच होती. हवामानानेही साथ दिल्याने थकवा काही जाणवत नव्हता. किर्र काळोखाच्या ही वाट अचानक एका जागेवर दुतर्फा झाली चालता चालता वाटेत एका बाजूला मुंग्यांचे भलेमोठे वारूळ लागले. डाव्या बाजूला एक धबधबा नजरेस पडला. येताना तिकडे जायचा विचार केला कारण आत्ता आधी वर पोहोचणं गरजेचं होतं एव्हाना भूक पण प्रचंड लागली होती.
चिटीयोंके भी महल होते हैं
काही वेळात आम्ही "बामण्या" सुळक्याला मागे टाकत ताहुली शिखराजवळ येऊन
पोहोचलो. ताहुली शिखर जवळ दिसल्यामुळे सगळा उत्साह एकत्र करून वर जाणाऱ्या
एका पायऱ्यांच्या वाटेवर जाऊन पोहोचलो खरंतर हा टप्पा चढायला जिवावर आलं होतं पण
हवामानाच्या साथीने आणि आमच्या प्रयत्नाच्या जीवावर आम्ही ताहुली शिखर
गाठलं.
ताहुली शिखर
समोर बामण्या सुळका आता खूप छोटासा वाटतं होता. शिखरावर पोहोचताच
समोर एक पाण्याचे टाके लागले. आणि त्यापुढे संत गाडगेबाबा धर्मशाळा. ह्या
धर्मशाळेत राहण्याचीही सोय होते. पुढे वाटेतच एक शंकराची पिंड दिसते. ढग बाजूला होते तोवर आजूबाजूची सगळी
दृश्ये कॅमेरात टिपली आणि जेवायला बसलो.
पाण्याचे टाके
निसर्गरम्य दृश्य
जिथे जेवायला बसलो तिथेच "पाचपीर "
नामक एक धार्मिक स्थळ होतं. त्याचे दर्शन घेतलं आणि पुन्हा निघायच्या
उद्देशाने सगळी आवराआवर केली आणि परतीच्या वाटेला लागलो. परतीच्या वाटेला
लागताच समोरचा परिसर सगळा धुक्याने व्यापला होता. म्हणून आधीच सगळे फोटो
काढले त्याचा फायदा झाला.
पाचपीर
परतीच्या वेळचे वातावरण
आता उतरताना मात्र थांबून अर्थ नव्हता एव्हाना
अडीच वाजले होते. उतरायला सुरुवात केली उतरताना वाटेत बरेच निसर्गरम्य देखावे दृष्टीक्षेपात आले. उशीर झालाच होता पण तरी कितीही घाई करून आम्ही सुमारे साडेपाचच्या
सुमारास पुन्हा धबधब्यापाशी येऊन पोहोचलो बाकी सगळ्यांची वाट पाहेपर्यंत मी
आपला पायातली पादत्राणे बाजूला सारून त्या धबधब्यात पाय सोडून बसलो.
निवांत
पुन्हा
सगळ्यांना एकत्र घेऊन ६ च्या सुमारास आम्ही घरच्या दिशेने रवाना झालो.
दुसऱ्यादिवशी सुट्टी असल्याने काही चिंता नव्हती पण हा ट्रेक मात्र थकवणारा
होता एवढं नक्की!!!खरंतर खालून वर पाहिल्यावर आम्ही गाठलेल्या ध्येयावर आम्हालाच विश्वास बसत नव्हता.
पण जे होतं ते खरं होतं.
मला तर असं वाटलं ह्या पर्वातला हा सगळ्यात उत्तम ट्रेक होता. आणि तो झालाही तसाच एक नंबर.
अविश्वसनीय ट्रेक
very nice
ReplyDeleteछान लहीले आहॆस मी आताच हा ट्रेक करून आलोय मी पण अंबरनाथ ला रहातो
ReplyDelete